मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आली तर, ते मुंबईचे ‘बॉम्बे’ करतील, असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. एका वृत्तवाहिनीवरील निवडणूक विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुंबईचं बॉम्बेकरण करण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय. मुंबईत भाजपप्रणित महायुतीची सत्ता आल्यास मुंबईची संस्कृती मारली जाईल. मुंबईचं व्यक्तिमत्वही मारलं जाईल असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. मुंबईचं बॉम्बेकरण रोखण्यासाठी महायुतीला रोखण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलंय.


















