राज्यात सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सोयी सुविधा दिल्या जातील, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र कोणतीही व्यवस्था भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची करण्यात आली नाही.
उमेदवारांना रस्त्यावर, पुलाखाली आडोसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची व्यवस्था करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी आज परिषद सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
मंगलकार्यालयात सोय करण्यात येत असून काही ठिकाणी गैरसोय असल्यास तेथे व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री यांच्याकडून देण्यात आले.



















