संघप्रमुखांंनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला , अमेरिकेच्या शुल्कांवरही बोलले.
नागपुर
विजयादशमी उत्सवानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना म्हटले की, “भारताला आता सतर्क राहावे लागेल आणि त्याच्या सुरक्षेसाठी तयार राहावे लागेल.”
आपल्या भाषणात संघप्रमुखांनी अमेरिकन टॅरिफवरही चर्चा केली आणि सांगितले की “आता देशाला स्वावलंबी व्हावे लागेल.”त्यांनी शेजारील देशांमधील राजकीय परिस्थितीचा उल्लेख केला आणि सांगितले की ,”ही भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण भारताचे या देशांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत.”
ते म्हणाले, “या वर्षी श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची ३५० वी जयंती आहे. ते भारताचे ढाल बनले आणि समाजाला अन्यायापासून मुक्त करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले. या वर्षी आपण अशा महान माणसाचे स्मरण करू.”
ते म्हणाले, “आज गांधीजींची जयंती आहे. त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. स्वातंत्र्यानंतर भारताची व्यवस्था कशी चालवावी याबद्दल कल्पना देणाऱ्यांमध्ये त्यांचे नाव होते.”
मोहन भागवत म्हणाले, “काही महिन्यांपुर्वी पहलगामची घटना घडली. धर्माबद्दल विचारल्यानंतर लोकांची हत्या करण्यात आली. संपुर्ण देश संताप आणि दुःखाने भरला होता. सैन्य आणि सरकारने पुर्ण तयारीने प्रतिसाद दिला. संपुर्ण घटनेने आमच्या नेतृत्वाची खंबीरता अधोरेखित केली. आम्ही सर्वांशी मैत्री राखू, परंतु आम्हाला स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक राहिले पाहिजे.”
नेपाळ आणि बांगलादेशसह भारताच्या काही शेजारील देशांमध्ये होणाऱ्या निदर्शने आणि आंदोलनांकडे लक्ष वेधत मोहन भागवत म्हणाले की “जेव्हा सरकार जनतेपासून दूर जाते तेव्हा लोक सरकारच्या विरोधात जातात.पण नाराजी व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा काही उपयोग नाही.”
ते म्हणाले, “जर आपण राजकीय क्रांतींचा इतिहास पाहिला तर त्यापैकी कोणत्याही क्रांतीला कधीही त्यांचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही. कम्युनिस्ट सरकार असलेल्या देशांमध्ये झालेल्या सर्व क्रांतींनी आघाडीच्या राष्ट्रांना भांडवलशाही राष्ट्रांमध्ये रुपांतरित केले आहे. हिंसक निदर्शनांचा कोणताही उद्देश साध्य होत नाही, उलट ते बाह्य शक्तींना त्यांचे खेळ खेळण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात.”
संघप्रमुखांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेच्या टॅरिफचाही उल्लेख केला.
ते म्हणाले, “अमेरिकेने स्वीकारलेल्या नवीन टॅरिफ धोरणाचा सर्वांनाच फटका बसत आहे. म्हणूनच आपल्याला जगभरात संबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण तुम्ही एकटे जगू शकत नाही.”
ते म्हणाले, “हे अवलंबित्व सक्तीमध्ये बदलू नये. म्हणून, आपण ते सक्ती बनू देऊ नये. त्याऐवजी, आपण स्वावलंबी बनले पाहिजे.”
ते म्हणाले, “अमेरिकेचे टॅरिफ धोरण स्वतःच्या हितासाठी बनवले आहे. पण ते सर्वांना प्रभावित करते. जग परस्परावलंबनावर चालते. अशाप्रकारे दोन देशांमधील संबंध तयार होतात. कोणताही देश एकाकी राहू शकत नाही. परंतु आपल्याला स्वदेशी संसाधनांवर अवलंबून राहून आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
माजी राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, “संघात कोणताही जातीय भेदभाव नाही.”
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे हा एक अतिशय आनंददायी योगायोग आहे. या प्रसंगी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”
ते म्हणाले, “आजचा विजयादशमी उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आहे. नागपूरची पवित्र भूमी आधुनिक भारतातील काही महान व्यक्तींच्या आठवणींशी जोडलेली आहे, ज्यात डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांचा समावेश आहे.”
कोविंद म्हणाले, “संघात कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव नाही. या प्रकारचा माझा पहिला अनुभव संघात होता. जिथे मला पुर्ण आदर मिळाला आणि कोणताही भेदभाव केला गेला नाही.”



















