*गुंडावर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!*
त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे.
या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे.
त्र्यंबकेश्वर येथ कुंभ मेळ्यासंदर्भात साधू महंताची
बैठक होती, त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश शुल्क वसुल करणाऱ्या गुंडांनी या पत्रकारांशी बाचाबाची करत त्यांना जबर मारहाण केली. यात झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि इतर दोन पत्रकार जखमी झाले आहेत.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी कृती करणाऱ्या हल्लेखोर गुंडांना कायमचा कठोर संदेश जाईल अशी कारवाई करावी.” अशी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया मागणी करत आहे.
शीतल करदेकर
संस्थापक अध्यक्ष
डॉ सुभाष सामंत
संस्थापक सरचिटणीस
लक्ष्मीकांत घोणसे पाटील
सरचिटणीस


















