Home Trending Now देश तरुणांचा, बुद्धीचा सन्मान  व भविष्य महत्त्वाचे!         सरकारची नैतिकता...

देश तरुणांचा, बुद्धीचा सन्मान  व भविष्य महत्त्वाचे!         सरकारची नैतिकता मेली, जबाबदारी झोपली , २०२६ चा भारत!`⚖️`- शीतल हरीश करदेकर

161
2

 

देश तरुणांचा, बुद्धीचा सन्मान  व भविष्य महत्त्वाचे!         सरकारची नैतिकता मेली, जबाबदारी झोपली , २०२६ चा भारत!`⚖️`

सत्ताकारण घाला चुलीत!- शीतल हरीश करदेकर

भारताच्या राजकीय इतिहासात `नैतिक जबाबदारी` हा शब्द एकेकाळी अभिमान होता.
कारण सरकार लोकांचं आणि लोकांसाठीचं लोकांनी चालवलं जाणार.
पण मागील १०वर्षांपासून जे काही सत्ताकारण चालले आहे ते काहीही करुन सर्व काही हातात ठेवून सर्व सामान्यांचे दमन करण्याचा तंत्र सुरु झालं.
आणि आता तर हुशार विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे घोटाळ्याचा ताण दिला. नीट घोटाळ्यात काही मुलांचे जीव गेले. भविष्य अंधारात टाकले गेले. असा असतो की भारत ? ही आपली युवाशक्ती आहे. तिच्यावर  खिळे काठीने मारहाण करता ?
हे सरकार आहे का? असं सरकार असतं का? याचं उत्तर नाही असंच येईल.

●`तेव्हा राजीनामे कशासाठी दिले गेले?`●`👇`          `●१९५१ – बाबासाहेब आंबेडकर`
`कारण`: हिंदू कोड बिल संसदेत मंजूर न झाल्याने तत्त्वासाठी पदत्याग केला. स्त्री हक्कांसाठी लढा दिला.

●`१९५६ – लाल बहादूर शास्त्री`
`कारण`: तामिळनाडू रेल्वे अपघात १४४ मृतांची नैतिक जबाबदारी घेतली. “खातं माझं, जबाबदारी माझी” म्हणाले.

●`१९५८ – टी.टी. कृष्णमाचारी`
`कारण`: मुंध्रा घोटाळ्यात वित्त मंत्रालयाची जबाबदारी. चौकशी होईपर्यंत पद सोडलं.

●`१९९३ – माधवराव शिंदे`
`कारण`: औरंगाबाद विमान अपघात. नागरी उड्डाण मंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारली.

●`२००८ – शिवराज पाटील`
`कारण`: २६/१ मुंबई हल्ल्यानंतर गृहमंत्री म्हणून अपयशाची जबाबदारी घेतली.                                                         `त्या वेळी `देश > पद > व्यक्ती` अशी क्रमवारी होती.`
`आता देश प्रथम हे नावापुरतेच..`खुर्ची प्रथम ?

●पण २०२६ मध्ये काय चित्र आहे?●`🤔

●१. शिक्षणाचा गोंधळ – जबाबदार कोण?●
`NEET पेपरफुटी` मुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात.
`शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान` आणि `पंतप्रधान नरेंद्र मोदी` यांच्यावर नैतिक जबाबदारीची मागणी.
पण उत्तर आलं – “ही व्यवस्थापकीय त्रुटी आहे”.
`CBI चौकशी` लावली, पण राजीनामा  घेणार नाही.

●२. आंदोलन चिरडलं – जबाबदार कोण?●
`२२ जुलै दादर NEET आंदोलन` – महिला आंदोलकांवर कथित अत्याचाराचे आरोप.
`गृहमंत्री अमित शहा` यांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांवर प्रश्न.
उत्तर आलं – “चौकशी करू”. बस्स?
`महिला कुस्तीपटू २०२३` आंदोलनापासून हाच पॅटर्न सुरु आहे.

●३. युवकांचा आवाज दाबला●
`सोनम वांगचुक` यांनी लडाख आणि NEET रिफॉर्मसाठी उपोषण केलं. उद्देश पूर्ण न होता उपोषण सोडावं लागलं.
ही `युवकांची फसवणूक` नाही का?

●सगळ्यात मोठा विरोधाभास●
`विरोधात असताना राजीनामा मागणारी` तीच `भाजपा` आज सत्तेत आल्यावर  फक्त `स्पष्टीकरण` देते. दडपशाही करतेय. खुर्ची सांभाळते आहे.

देशाचं वर्तमान आणि भविष्य `🇮🇳`                           ●`वर्तमान – २०२६`●
१. `शिक्षण संकटात` – पेपर लीक, CBI चौकशी. मुलांचं १ वर्ष वाया `
२. `आवाज दाबला जातोय` – प्रश्न विचारला की लाठीचार्ज
३. `नैतिकता संपली` – चूक झाली तरी जबाबदारी नाही. फक्त समिती
४. `युवक हताश` – नोकरी नाही, न्याय नाही

●`भविष्य – जर असंच राहिलं तर`●
१. `ब्रेन ड्रेन` – हुशार मुलं भारत सोडतील
२ `अविश्वास` – सिस्टमवरून विश्वास उडेल
३. `कमकुवत लोकशाही` – प्रश्न बंद = हुकूमशाही
४. `युवाशक्ती वाया` – जी ताकद देश घडवू शकते ती न्याय मागतेय

●`पण भविष्य बदलू शकतो`●
जर `जनता` जागी झाली. आहे`जबाबदारी` मागितली हे उत्तम झालय.
`देश तरुणांचा आहे`. `बुद्धीचा सन्मान` झाला पाहिजे. `भविष्य महत्त्वाचे` आहे `❤️`

प्रश्न एकच आहे
अपघात झाला की शास्त्री जी राजीनामा द्यायचे,
मग आता `शिक्षण बिघडलं + आंदोलन चिरडलं` तरी जबाबदारी का नाही? कोण आहात आपण याचा विचार  करणेही सोडलं आहे असच दिसतय.

माऊली, लोकशाहीत `जनता` हाच सर्वात मोठा न्यायाधीश आहे .
`युवकांचं शिक्षण आणि सुरक्षितता` – या दोन्हीसाठी आवाज उठवणे थांबवू शकत नाही कुणीच.

_तुम्हाला काय वाटतं? राजीनामा द्यावाच लागेल न? कमेंट करा_ `👇“

#NEET2026 #नैतिकजबाबदारी #सोनमवांगचुक #दादरआंदोलन #YouthVoice #DharmendraPradhan #AmitShah #NarendraModi`

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here