बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातील वीज बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते,बेस्टने गेल्या एका वर्षात जसजसे कर्मचारी निवृत होत आहे,तसे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे मुंबई मधील 100% पैकी 60% वीज बिल भरणा केंद्र बंद केले आहेत.त्यामुळे साहजिकच वीज भरणा केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा असतात,आणि नागरिक बिल जास्त आले किंवा अजून काही तक्रार असेल तर त्यांचा रोष का सदर कर्मचारी वर्गावर असतो.तसेच कर्मचारी कमी असल्याने सदर विभागातील कर्मचारी वर्गास रोज वेगवेगळ्या वीज बिल भरणा केंद्रावर अधिकारी पाठवत असतात,पूर्वी ह्यांना एक केंद्र फिक्स असायचे.पण अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे हा गोंधळ रोज होत आहे.
बेस्ट कडे नागरिक पैसे घेऊन रोज येत आहेत,पण बेस्ट नियोजन शून्य असल्याने ते त्यांना नीट घेता येत नाही.
















