
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प आणि वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणार्या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



















