लालपरीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेऊ शकतात आहे. शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते या बातम्यांना एस टी महामंडळाने पूर्णविराम दिला आहे. लाल परी च्या प्रवासातून शिवशाही बस थांबण्याची शक्यता असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या.
दरम्यान यावर एसटी महामंडळाने अशा प्रकारचा कोणताही विचार नसल्याचे तसेच एसटी महामंडळामध्ये सध्या 792 शिवशाही वातानुकूलित बसेस चालनामध्ये आहेत
त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही आणि म्हणून या शिवशाही बसेस बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही असे स्पष्ट केले आहे.

















