Home Uncategorized *वांद्रे येथे साकारतेय ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिर*

*वांद्रे येथे साकारतेय ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिर*

96
0

*पुण्‍यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त खास आरास*

मुंबई,
दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्‍यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवा निमित्त ५२ फुट उंचीचे हुबेहुब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येते आहे. शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळातर्फे राबविण्यात येणार आहेत.

ना.ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे ३० वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिध्द मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते.

विविध जातीधर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे.

काय आहे यावर्षीची संकल्पना
श्री काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिलिंगंपैकी एक आहे. हे मंदिर उत्त प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. क्रूर आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली ‘अनेक शतके गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले.

हिंदुधर्मानुसार, काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणे आणि गंगेत स्नान करणे हे मुक्ती किंवा मोक्षाच्या मार्गावरील महत्वाचे टप्पे आहेत.या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे. इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढले गेले आहे. उत्तर भारतातील मंदिरांप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नागर शैलीत बांधण्यात आले आहे.मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपऱ्यात काशी विश्वनाथांची मुख्य शिव पिंडी आहे, त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढवले आहे.

त्‍याच मंदिराची हुबेहुब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्‍यात आली आहे. मंदिराचा कळस, वैशिष्टपुर्ण असलेले खांब, विश्वेश्वराची पिंड या सगळयाची हुबेहुब प्रतिकृती साकरली जाणार आहे. यासोबतच या संपुर्ण परिसरात दिव्‍यांची खास रोशणाई करण्‍यात आली असून तरुणांसाठी ही रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी मंदिर आणि ही रोषणाई पाहण्‍यासाठी मोठी गर्दी होते तसेच याही वर्षीची आरास गणेशभ्‍क्‍तांना नक्‍की आवडेल असा विश्‍वास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्‍यक्‍त केला आहे.

दरम्यान, राज्य शासनातर्फे गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या १२ गडकिल्ले यांना जागतिक युनोस्कोचा दर्जा मिळाला त्या निमित्ताने या किल्यांच प्रदर्शन, ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी या बाबतही जनजागृती करण्यात या मंडळाचा पुढाकार राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here