”- बच्चू कडू *…आता आमची भगतिसिंहगिरी सुरू झाली!* शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले ! संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन !
अमरावती : ” गडचिरोलीतल्या खाणींमधून काढलेला माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे; तिथून तो जहाजातून विदेशापर्यंत गेला पाहिजे, म्हणून एका उद्योगपतीच्या कंपनीसाठी ८० हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ मार्ग उभारणार आणि शेतकऱ्यांना साधी कर्जमाफी देण्यासाठी टाळाटाळ करत असाल, तर खबरदार!
आता आमची गांधीगिरी संपली आहे. आहे” , अशा तीव्र शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे.


















