Home Uncategorized *रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड*

*रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी राज्यमंत्री रामदास आठवले यांची बिनविरोध निवड*

96
0

नवीदिल्ली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवीदिल्लीत आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या बैठकीला देशभरातून ३२ राज्यांचे रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आणि पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.
येत्या ५ वर्षात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशभरातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणुका आयोगाची मान्यता मिळविणारा राष्ट्रीय पक्ष करायचा आहे.त्यासाठी किमान ४ राज्यांत मान्यता आणि २खासदार लोकसभेत निवडून आणले पाहिजेत. सध्या रिपब्लिकन पक्षाला मणिपूर आणि नागालँड या दोन राज्यांत मान्यता मिळालेली आहे.लवकरच रिपब्लिकन पक्षाला आसाम , महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तर प्रदेश, पाँडिचेरी, दीव दमण दादरा नगर हवेली या राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशात मान्यता मिळू शकते.आगामी काळात रिपब्लिकन पक्षाचे लोकसभेत खासदार निवडून येतील त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करून रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण केले पाहिजे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.

रिपब्लिकन पक्ष दलित आदिवासी मुस्लिम सर्व अल्पसंख्यांक यांना घेऊन; बहुजन वर्गाची एकजूट उभारून, रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद उभी करणार आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवर्तनाचा विचार देशभरात पोहोचवणार आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष देशभरात घराघरापर्यंत पोहोचवणार असल्याचा ,निर्धार ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला गुजरात चे जतीन भुट्टा, महाराष्ट्रातून अविनाश महातेकर,गौतम सोनवणे सुरेश बार्शिंग, कर्नाटक मधून व्यंकट स्वामी,राजस्थान मधून राधामोहन सैनी,हरियाणा चे रवी कुंडली, सिक्किम चे नाम ग्याल, मणिपूर चे महेश्वर थनमजोम ,आंध्र प्रदेश ब्रह्मानंद रेड्डी, तेलंगणा चे नागेश्वर राव , रवी पासुला, पंजाब च्या मंजु छिबेर, काश्मीर च्या संध्या गुप्ता, गुजरात चे राजकुमार टाक, शैलेश भाई शुक्ला, उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता व राहुलन आंबवडेकर, महाराष्ट्रातून सीमाताई आठवले, शीला ताई गांगुर्डे, एम एस नंदा, काकासाहेब खांबलकर; दयाळ बहादुर, ॲड बी के बर्वे,ॲड मंदार जोशी,अनिलभाई गांगुर्डे, विजयराज ढमाळ, बशीरभाई आदी अनेक मनावर या बैठकीत उपस्थित राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here