Home मुंबई *छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात अभिवादन*

16
0

*”शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन”*

मुंबई,
” स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन परिसरात त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत कृतज्ञतापुर्वक अभिवादन केले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की,” छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शक्ती व बळ मिळावे, तसेच तुळजाभवानीचे आशीर्वाद लाभावेत.” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

विधानमंडळात थोर विभुतींच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याची परंपरा सातत्याने जपली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींच्या कार्याची आठवण करून देणारे हे क्षण समाजाला नवी दिशा देणारे ठरतात.” असे त्या म्हणाल्या.

यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, खासगी सचिव अविनाश रणखांब, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष उडतेवार तसेच विधिमंडळ कर्मचारी उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण महाराष्ट्रासह देश-विदेशात मोठ्या प्रमाणात होत असून, त्यांच्या कार्यातून पुढील पिढ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि स्फुर्ती मिळत राहील.”असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here