_”विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।”_- महात्मा ज्योतिबा फुले_
हा फुले वाडा आहे.हे `राज्य संरक्षित स्मारक` आहे. महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे.
*याच ठिकाणाहून सुरू झालं:*
१.१८६३ – भारतातील पहिलं `बालहत्या प्रतिबंध गृह`. विधवांना आधार.
२. १८६४ – पुण्यातील `पहिला विधवा पुनर्विवाह`.
३ १८७३ – `सत्यशोधक समाज`. स्त्री-शूद्रांच्या शिक्षणाचा आग्रह.
●सध्याचा प्रश्न काय आहे?
जानेवारीत इथे कार्यक्रमांना `बंदी` होती.
जूनमध्ये `पूर्वीपासूनच्या रूढींना परवानगी` मिळाली. त्यामुळे वटपूजन झाले.
पुरोगामी संघटना म्हणतात – “हा विचारांचा अवमान आहे.”
आयोजक म्हणतात – “ही अनेक वर्षांची परंपरा आहे.”
माझा प्रश्न फक्त एकच आहे:
जर हे स्थळ “समतेचे तीर्थक्षेत्र” असेल,
तर इथले सगळे निर्णय `समान निकषाने` व्हावेत का?
चला, या वडाला फुलेंचा अर्थ देऊया.
प्रदक्षिणा मारताना म्हणूया:
_”आमच्या संसारात सावित्रीबाईंसारखी जिद्द,
ज्योतिबांसारखा विवेक आणि समता असो.” वडाचं झाड ऑक्सिजन देतं , तर महिलांनी झाडाला फेर्या का मारु नयेत. आणि इथेच फुले दांपत्याना नतमस्तक होऊन वारसा चालवण्याचा आशीर्वाद मागण्यांवर तर अजिबात आक्षेप असू नये. जुने चांगले ते जपणे , सुधारून पुढे जाणे आवश्यक आहे. कोण कोणत्या पक्षाचे याचा संबंध असूच नये.
तुमचं मत कमेंटमध्ये मांडा 👇
#समतेचे_वटपूजन #फुले_वाडा #सत्यशोधक #समान_निकष #शीतलहरीशकरदेकर
*जय ज्योती जय सावित्री!*




















