Home आरोग्य / पर्यावरण जागरूकता ठेवली तर मोठ्या प्रमाणावर वणवे टाळता येतील -ना. उदय सामंत

जागरूकता ठेवली तर मोठ्या प्रमाणावर वणवे टाळता येतील -ना. उदय सामंत

96
0

चिपळूण येथे शनिवारी वनविभाग रत्नागिरी आणि सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप तसेच वनवणवा प्रतिबंधात्मक उपाय योजना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. याप्रसंगी ना. उदय सामंत म्हणाले की,”शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि निसर्ग संवर्धनाच्या कामात सहभागी होता यावे, याच उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.


वणवा ही निसर्गाची आपत्ती नसून,अनेकदा मानवनिर्मित चूक असते. वणवा लागल्यावर नुकसानभरपाई मागितली जाते, पण टाकलेली सिगरेट, पेटवलेले गवत यामुळेच निसर्गाची हानी होते.प्रत्येकाने आपल्या बागेतील गवत वेळेवर हटवले, जागरूकता ठेवली तर मोठ्या प्रमाणावर वणवे टाळता येऊ शकतात,” असेही ना. उदय सामंत यांनी सांगितले.
तसेच “काही ठिकाणी जाणूनबुजून वणवे लावणारे गुन्हेगार सक्रिय आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी” अशा सूचनाही यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी दिल्या.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, उमेश सकपाळ यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here