Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठकीत 860.21 कोटींच्या आराखड्यास मंजुरी *जनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री...

जिल्हा नियोजन समिती बैठकीत 860.21 कोटींच्या आराखड्यास मंजुरी *जनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री उदय सामंत*

187
0

*रत्नागिरी, दि.2 (जिमाका) : कोणत्या विभागात खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत जिल्हाधिऱ्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा.उJ ठराव मांडला. आमदार निकम यांनी डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याप्रस्तावाला पाठींबा देताना खासदार राणे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत यश मिळवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वकष अर्थसंकल्प सादर करुन देशाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर आणल्याबद्दल प्रधानमंत्री, अर्थमंत्री आणि सहकारी मंत्र्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा देतो.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन 31 मार्च पर्यंत 100 निधी खर्च केला जाईल, असे सांगितले. सभेच्या सुरुवातीला दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. खासदार राणे, खासदार तटकरे, आमदार निकम, आमदार जाधव, आमदार लाड, आमदार सामंत यांनी विविध विषयांवर सहभाग घेतला. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here