*उल्हासनगर व कल्याणचे नागरिक वीज वितरण विभागामुळे हैराण, दिवसातून अनेकवेळा वीज खंडित – उपकरणे खराब*
*उल्हासनगर/कल्याण, ता. २६:* उल्हासनगर व कल्याणच्या संपूर्ण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
राज्य वीज विद्युत वितरण विभागाच्या (MSEDCL) वतीने सतत उल्हासनगर, कल्याण शहर तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीनसारखी महागडी घरगुती उपकरणे खराब झाली आहेत. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
*मेंटेनन्सच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार?*
अनेक वर्षांपासून राज्य वीज वितरण विभागात मेंटेनन्सच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात होते, परंतु ते आता प्रत्यक्षात दिसून येत आहे. करोडो रुपये वीज वितरण विभागात मेंटेनन्सच्या नावावर खर्च केला जातो, तरीही बाराही महिने वीज वितरण विभाग वीज पुरवठा खंडित करून कुठल्या न कुठल्या यंत्रणेवर डागडुजीचे काम करत असल्याचे चित्र आहे. ही मोठी शोकांतिका आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर दररोज वीज खंडित होत असेल, तर हा पैसा जातो कुठे? लहान व्यावसायिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
वीज वितरण विभागाने तातडीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
*- MAI MEDIA 24, उल्हासनगर-कल्याण*
*SEO टॅग्स:*
Slug: ulhasnagar-kalyan-veer-vitaran-hairan-divsatun-anekda-light-cut
Tags: Ulhasnagar Light Cut, Kalyan Power Cut, MSEDCL, MSEDCL Corruption, Ulhasnagar News, Kalyan News
*
























