*MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा – विश्वजीत कदम सहभागी*
MPSCच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन आणि निकालातील गोंधळाविरोधात आज पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, ही या मोर्चाची प्रमुख मागणी होती.
ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.
*काँग्रेसचा पाठिंबा:*
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चाला पाठिंबा देत काँग्रेस नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
त्यांच्या आवाहनानुसार माजी मंत्री *आ. डॉ. विश्वजीत कदम*, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर पूर्व अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम जिल्हाध्यक्षा दीप्ती चवधरी, भाऊसाहेब आजबे, हनुमंत पवार, आमिर शेख, धनंजय शिंदे यांच्यासह NSUI, युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
*विश्वजीत कदम म्हणाले:*
“राज्यातील लाखो विद्यार्थी अनेक वर्षे मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. परीक्षा प्रक्रियेबाबत वारंवार प्रश्न निर्माण होत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. MPSC अध्यक्ष व सचिवांनी राजीनामा द्यावा आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे,” अशी मागणी आमदार विश्वजीत कदम यांनी केली.
काँग्रेस नेते *राहुल गांधी* यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
*वाचा सविस्तर: http://mai24news.in*
*#MPSC #PuneMorcha #AakroshMorcha #VishwajeetKadam #HarshwardhanSapkale #RahulGandhi #MaiMedia24*
—






















