Home महाराष्ट्र “महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला आपली उपस्थिती संस्मरणीय”-डॉ.नीलम गोऱ्हे ...

“महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला आपली उपस्थिती संस्मरणीय”-डॉ.नीलम गोऱ्हे उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचे आभार मानताना डॉ.गोऱ्हे यांचे गौरवोद्गार

196
0

भारतीय संस्कृतीत गुरुना महत्वपूर्ण स्थान आहे!! असेही संतवचन आहे की,’साधुसंत येती घरा तोची दिवाळी-दसरा  असाच हा सोहळा आहे

  • आपल्या देशातील लोकशाही मूल्ये आणि नैतिकता वाढविणे” या महत्त्वाच्या विषयावर आपले मत ऐकणे आम्हास बंधनकारक -डॉ.नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ११ जुलै २०२० रोजी विधानभवन, मुंबई येथे “आपल्या देशातील लोकशाही मूल्ये आणि नैतिकता वाढविणे” या विषयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या भाषणाबद्दल माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचे आभार मानण्यासाठी भाषण केल

महोदय, महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याची तुमची उपस्थिती स्मरणात राहील.

भारतीय संस्कृतीत गुरुना महत्वपूर्ण स्थान आहे!! असेही संतवचन आहे की,’साधुसंत येती घरा तोची दिवाळी-दसरा तसेच महत्त्व आजच्या आपल्या येण्याला ,मार्गदर्शनाला आहे असे गौरवोद्गार विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी काढले!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ११ जुलै २०२० रोजी विधानभवन, मुंबई येथे “आपल्या देशातील लोकशाही मूल्ये आणि नैतिकता वाढविणे” या विषयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या भाषणाबद्दल माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचे आभार मानण्यासाठी भाषण केले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ११ जुलै २०२० रोजी विधानभवन, मुंबई येथे “आपल्या देशातील लोकशाही मूल्ये आणि नैतिकता वाढविणे” या विषयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या भाषणाबद्दल माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचे आभार मानण्यासाठी भाषण केल

महोदय, महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याची तुमची उपस्थिती स्मरणात राहील

“आपल्या देशातील लोकशाही मूल्ये आणि नैतिकता वाढविणे” या महत्त्वाच्या विषयावर आपले मत ऐकणे आम्हा सर्वांना बंधनकारक आहे.

महोदय, तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे केवळ विधिमंडळातच नव्हे, तर सार्वजनिक जीवनात आणि कुटुंबांमध्येही शिष्टाचार आणि प्रामाणिकपणा राखून लोकशाही संस्थांवरील लोकांचा विश्वास दृढ करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. या महान राष्ट्राच्या जनतेने आपण प्रगल्भ मतदार आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या व्यवस्थेवर आणि जनादेशाने स्थापन केलेल्या सरकारवर त्यांचा विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे. आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पुढील पाच वर्षे या देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन केला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

आपली आदरणीय संसद ही देशाला पुढे नेण्यासाठी पुरोगामी उपाययोजनांचे प्रतिक आहे, परंतु लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यातील राज्यकर्ते म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आपण कमकुवत होऊ देऊ शकत नाही.
महोदय, भारतातील थोर नेत्यांनी वर्षानुवर्षे घालून दिलेले नियम-कायदे तसेच परंपरांचे पालन करून तुम्ही राज्यसभेचे, कामकाज किती चिकाटीने चालवत आहात, हे आपण पाहतो. विरोधी पक्षात किंवा सत्तापक्षात त्यांनी वादविवाद, चर्चा आणि शिष्टाचाराचा गौरवशाली विक्रम रचला आहे. हा भक्कम पाया ढवळून काढण्याचा प्रयत्न झाला, तर तुमच्यासारखे राज्यकर्ते खंबीरपणे उभे राहतात आणि अशी अवांछित परिस्थिती निर्माण होऊ देत नाहीत. तुमचे विविध निर्णय माझ्यासारख्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.

माननीय उपराष्ट्रपती महोदय, आता तुम्हाला कोणत्या हेतूने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाला संबोधित करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, याविषयी काही महत्त्वाची माहिती देते. सध्या आपण महाराष्ट्र विधान परिषदेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहोत.वर्षभरात अनेक घटना घडल्या आहेत. त्यापैकी फक्त दोनच उल्लेख करू इच्छिते. सर्वप्रथम ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता विधानपरिषद सभागृहाची गरज आणि त्याचे महत्त्व. त्यात अनेक ज्येष्ठ सदस्य आणि प्रसारमाध्यमांनी विधानपरिषद सभागृहाशी निगडित आपल्या आठवणी सांगितल्या.

त्यानंतर ८ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनांचे योगदान या विषयावर अशाच प्रकारचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी आहे. सार्वजनिक करारानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरते. साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे अधिवेशन घेतले म्हणून हे हिवाळी अधिवेशन म्हणून ओळखले जाते.त्यानंतर ८ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनांचे योगदान या विषयावर अशाच प्रकारचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी आहे. सार्वजनिक करारानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरते. साधारणत: नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे अधिवेशन घेतले म्हणून हे हिवाळी अधिवेशन म्हणून ओळखले जाते.विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतील जनतेच्या आकांक्षा सभागृहात प्रभावीपणे मांडाव्यात, ही या व्यवस्थेमागची संकल्पना आहे.

त्यामुळे हिवाळी अधिवेशनाला आपल्या राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. आपण द्विसदनीय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विधानपरिषदेची भूमिका अधिकाधिक स्पष्ट होत गेली आहे. लोकशाहीच्या दोन्ही सभागृहांना समान महत्त्व आहे, असे वारंवार सांगून आपल्या नेत्यांनी विधान परिषदेला तितकेच महत्त्व दिले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून अनेक दिग्गज व्यक्ती होऊन गेलेत. ज्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, माननीय गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महत्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

काही सार्वजनिक व्यक्ती आमच्या निवडून आलेल्या राज्यकर्त्यांबद्दल कशा प्रकारे बोलतात याबद्दल माझी चिंता आहे. मला आशा आहे की असे टीकाकार किमान विधिमंडळात आणि सार्वजनिक व्यासपीठावर प्रतिष्ठेची भाषा वापरतील. दुर्दैवाने, भारतावर आणि विधिमंडळांवर विश्वास नसल्याची भावना व्यक्त करून ते सातत्याने लोकशाही संस्थांना कमकुवत करतात. लोकशाहीत निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याने सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊन योगदान देणे अपेक्षित असते. मात्र, क्षुल्लक कारणास्तव सभागृहाचे कामकाज वारंवार रोखणे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांना निवडून दिलेल्या लोकांना पडला आहे. असे लोक सतत खोटी कथा घेऊन पुढे येत असतात. याची पुनरावृत्ती दिवस-रात्र प्रसारमाध्यमांसमोर केली जाते. या वक्तव्यांचा समाजातील काही घटकांवर प्रभाव पडतो. असे वर्तन सर्वच बाजूंनी टाळले पाहिजे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

महोदय, तुमच्या उच्च पदाच्या माध्यमातून माझे तुम्हाला आवाहन आहे की, संपूर्ण देशात शिस्त आणि शिष्टाचार वाढविण्याच्या प्रयत्नांना गती द्या. मी अनेक देशांमध्ये फिरले आहे आणि गंभीर वातावरणात राजकारण कसे चालते हे पाहिले आहे. ते प्रत्येक वेळी व्यत्यय आणणारे असण्याची गरज नाही. मला आशा आहे की भारतातही असे होईल. या पार्श्वभूमीवर ‘आपल्या देशातील लोकशाही मूल्ये आणि नैतिकता वाढविणे’ या विषयावरील आपल्या विचारांनी आमच्या सर्वांसाठी एक वेगळा दृष्टीकोन खुला केला आहे. मला खात्री आहे की यामुळे आपल्या कामकाजात लोकशाही मूल्यांचा प्रसार होईल.

आदरणीय धनखड़जी, मला खात्री आहे की सभागृहाची, सत्तापक्षाची आणि विरोधी बाजूची प्रतिष्ठा राखण्याच्या माझ्या विनंतीला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्याल.

या अनोख्या प्रसंगी तुमचे लोकशाहीच्या या मंदिरात उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानताना मला खूप आनंद होत आहे. एवढ्या संयमाने माझं बोलणं ऐकल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि तुम्हाला सुखी भविष्यासाठी शुभेच्छा देते.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ , महाराष्ट्राचे मा राज्यपाल रमेश बैस , महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, यावेळी दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जी, विजय वडेट्टीवार जी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here