Home Trending Now विधान परिषद २०२६ – ICU मधून बाहेर निघावी, लोकशाहीचे मंदिर बनावे*

विधान परिषद २०२६ – ICU मधून बाहेर निघावी, लोकशाहीचे मंदिर बनावे*

83
0

“मी शांत आहे पण विचार पक्का आहे. – MAI अध्यक्ष शीतल हरीष करदेकर”_

*’मायमीडिया24′ चा वचननामा:* जल, जंगल, जमीन, श्रमिक – यासाठी लढू. ‘रुद्र साक्षी आहे.

*’लोकशाही’ ची ४मंदिरं असतात – लोकसभा, विधानसभा, ग्रामसभा आणि विधान परिषद.*

*’दुर्दैव’ असे की, महाराष्ट्राची विधान परिषद ‘आज’ ICU मध्ये आहे. अशाप्रकारे माध्यमातून  चर्चा होते.

ऑक्सिजन’ नाही, ‘उपचार’ नाही, ‘डॉक्टर’ फक्त ‘बिल’ वाढवतायेत.* ‘प्रश्न’  असा आहे – हे ‘ICU’ पुन्हा ‘मंदिर’ होईल का?*

. *’आज’ विधान परिषद = ‘राजकीय पुनर्वसन केंद्र’*

‘लोकसभा’ किंवा ‘विधानसभा’ निवडणुकीत ‘पराभूत’ झालेले, ‘पक्ष’ बदलून आलेले, ‘मोठ्या नेत्यांचे’ PA – यांची ‘सोय’ लावायची ‘जागा’ म्हणजे विधान परिषद.

‘हाऊस ऑफ एल्डर्स’ ऐवजी ‘हाऊस ऑफ फेल्युअर्स’  झालीय. असं खेदाने म्हणावसं वाटतं.

‘विचारवंत’ कुठे आहेत? ‘शिक्षक’ कुठे आहेत? ‘श्रमिक’ नेता कुठे आहे? ‘शेतकरी’ प्रतिनिधी कुठे आहे?

‘पेट्या’ देऊन ‘आमदारकी’ विकत घेणारे ‘आज’ तिथे बसू लागले तर सगळी गडबड आहे.

‘हे’ मंदिर नाही  इथे  ‘लोकशाही’ ची ‘राख’ झालीय._

 

*२ २०२६ निवडणूक – वस्तुस्थिती*

– *एकूण जागा:* १७ – स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ

-*बिनविरोध:* ५ जागा महायुतीला – वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, पुणे, ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ

*लढतीच्या:* १२ जागा – महायुती विरुद्ध मविआ

*मतदान:* १८ जून २०२६ | *निकाल:* २२ जून २०२६

● *अमरावती:* काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख ICU मध्ये. पक्षात ‘१५-२०कोटीत मॅनेज’ झाल्याचा आरोप होतोय.

३. ‘मंदिर’ कसं असावं? – ‘घटना’ काय सांगते?*

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरां’नी विधान परिषद का दिली ती  महत्त्वाची आहे ‘का’ सांगितलं?

“लोकसभा ‘भावनेच्या’ भरात निर्णय घेईल, तेव्हा ‘शांतपणे’ विचार करणारं, ‘अनुभवाने’ मार्ग दाखवणारं सभागृह हवं.”    ‘म्हणून’ शिक्षक, पदवीधर, साहित्य, कला, विज्ञान, सहकार, समाजसेवा – _’या क्षेत्रातले नंबर १ लोक’ इथे यावेत.       आज’ काय चित्र आहे? ‘शिक्षक’ मतदारसंघात ‘शिक्षण सम्राट’ निवडून येतात. ‘मंदिरा’च्या ‘गाभाऱ्यात’ बाजार भरलाय.        ४. ‘ICU’ मधून ‘मंदिर’ कसं बनवायचं? – ५ उपाय ‘ताबडतोब’ करायला हवा.

१. ‘पेट्या बंद’_  खर्चाची मर्यादा आणा. ‘आमदार’ विकत घेणारे ‘अपात्र’ ठरवा.                                                        २. ‘५०% जागा राखीव’_  शिक्षक, श्रमिक, शेतकरी, महिला, कृतिशील तरुण, विचारवंत यांच्यासाठी. इथे ‘राजकारणी’ नको  ‘समाजकारणी’ हवेत.                                     . ३.’कामाचे तास’ ठरवा_ – वर्षातून ‘किमान १००दिवस कामकाज करावे.’पगार’ घेता, ‘काम’ करा.                . ४.जनतेचा जाब’_  दर 6 महिन्यांनी ‘जाहीर हिशोब’ द्यावा. तेही लाईव्ह करा. ‘सेन्सॉर’ नको.                                                 ५. ‘नो हाऊस, नो पेन्शन’_ जे ‘आमदार’ सभागृहात ‘बोलत’ नाहीत  त्यांची ‘पेन्शन’ बंद. फुकटचा पगार’ बंद करावा.

५.*आमचे ४ सवाल:*

१. १७ पैकी ५ जागा बिनविरोध होतात . त्यासाठी जी काही कसरत चालते . मीडियामधून सगळं नाटक दिसत असतं. मग चॅनल्स  व सोशल मीडियावर वेगळंच काम सुरु होतं.इथे न्यायालयाप्रमाणे  चर्चा होतात, आरोप प्रत्यारोप  होतात. घोडेबाजार काय दबावतंत्र काय काहीही बोललं जातं आपण पहाताना प्रश्न पडतो अरे बाबांनो काय चाललय हे? ‘लोकशाही’ जिवंत आहे का? का पार बुडवणार अरबी समुद्रात?              २. उमेदवार ICU मध्ये, पक्ष ‘घोडेबाजार’ बोलतो – हे ‘सर्वोच्च सभागृह’  आहे त्यासाठीची निवडणूक  आहे. हे सगळं  शोभतं का?                                                                                ३. ‘शिक्षक-पदवीधर’ मतदारसंघात ‘पक्षाचे कार्यकर्ते’ का? ‘तज्ज्ञ’ कुठे गेले?                                                             ४. ‘विधान परिषद’ रद्द का करू नये असे प्रश्न अनेकदा उठले  जर ती फक्त ‘राजकीय डील’ साठीच वापरायची असेल तर याला सर्वोच्च  सभागृह  म्हणावे कसे? काय विचार करणार हे लोक जनहिताचा?

 

 

*’समारोप’ –                                                                प्रतिज्ञा घ्यायला हवी की ,लोकशाही ‘वाचवा’. ‘ती’ मेली तर ‘आपण’ सगळे ‘मेलो’.”                                              ‘म्हणून’ ‘रुद्राक्ष’ हातात घेऊन ‘शपथ’ घेतोय:_ जो’ पर्यंत विधान परिषद ‘पुनर्वसन केंद्र’ आहे, ‘तो’ पर्यंत लढू .लिहित राहू बोलत राहू मार्ग  अनेक आहेत. ज्या’ दिवशी तिथे खरा  ‘शिक्षक’ बसेल, ‘शेतकरी’ बोलेल, ‘श्रमिक पत्रकार हिताचे’ कायदे बनवेल – ‘त्या’ दिवशी ‘ते’ मंदिर होईल._ ‘आणि’ त्या ‘मंदिरा’चा ‘पहिला’ घंटानाद ‘ आम्ही ‘ करु!                                    आज’ परिस्थिती वाईट आहे._ ‘पण’ येणारा काळ ‘श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा आणि विचारवंत कृतिशील तरुणाईचा’ असेल._ ‘त्या’ उद्यासाठी ‘आज’ विधान परिषद ‘शुद्ध’ करा .

*’जय महाराष्ट्र. जय लोकशाही. जय रुद्र. जय श्रमिक.’ 🙏*    _- शीतल हरीश करदेकर- प्रो. माईमीडिया24  _संस्थापक अध्यक्ष, मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया,सदस्य, मजिठिया त्रिपक्षीय निरीक्षण समिती, महाराष्ट्र शासन

 

*’जय दोन आघाडी. जय खरा विचार. जय रुद्र. जय श्रमिक.’ 🙏*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here