🖊️
*दिनेश शिंदे*
राष्ट्रीय सह समन्वयक व
प्रसार माध्यम समन्वयक
*शिवसेना पक्ष*
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेनेने केवळ विधानसभेपुरते किंवा लोकसभेपुरते आपले अस्तित्व मर्यादित ठेवले नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जनाधार आणि संघटनशक्तीच्या बळावर भक्कम स्थान निर्माण केले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा प्रत्येक स्तरावर शिवसेनेने लोकप्रतिनिधींची मजबूत फळी उभी करत विकासाभिमुख राजकारणाचा आदर्श निर्माण केला आहे.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून शाखा, उपशाखा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजाशी जुळलेली नाळ ही पक्षाची सर्वात मोठी ताकद राहिली आहे. याच संघटनात्मक बळावर आता मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेनेने ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने आपला प्रभाव वाढवला. जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट जोडलेले राहणे, स्थानिक पातळीवरील विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी यामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर व्यापक स्वीकार मिळाला.
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पक्षासोबत महायुतीचा महत्त्वाचा घटक म्हणून राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत सहभागी आहे. २०२५-२६ मधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने २८८ पैकी २०७ नगराध्यक्षपदे जिंकून राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामध्ये शिवसेनेने ५० हून अधिक नगराध्यक्षपदे जिंकत महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर एक हजारांहून अधिक सदस्य निवडून आणत पक्षाने आपली संघटनात्मक ताकद पुन्हा अधोरेखित केली.
महानगरपालिका क्षेत्रातही शिवसेनेची ताकद विशेष उल्लेखनीय आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि मुंबई महानगर प्रदेशातील विविध नागरी संस्थांमध्ये शिवसेना प्रभावी भूमिका बजावत आहे. अनेक ठिकाणी शिवसेना नेतृत्वाखाली सत्तास्थापना झाली असून काही ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून संयुक्त सत्ता कार्यरत आहे. शहरी विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकाभिमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सक्रिय योगदान देत आहेत.
ग्रामीण महाराष्ट्रातही शिवसेनेची ताकद सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे मोठे प्रतिनिधित्व असून कोकण, ठाणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी विकासकामांमध्ये आघाडीवर आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या सत्तास्थापनेत शिवसेना निर्णायक भूमिका बजावत असून ग्रामीण विकास, पाणी योजना, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवत आहे.
धाराशिवसारख्या जिल्हा परिषदांमध्ये महायुतीच्या सत्तास्थापनेत शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्येही शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य स्थानिक विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करत आहेत. ग्रामविकास आणि लोकसहभागावर आधारित कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागात पक्षाची मुळे अधिक घट्ट होत आहेत.
शिवसेनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशामागे केवळ निवडणूक विजय नसून शिवसेना नेतृत्वाचा लोकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क, सामाजिक कार्याची परंपरा, आपत्ती काळातील मदतकार्य, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वृत्ती आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही प्रमुख कारणे आहेत. यामुळेच पक्षाने तळागाळातील जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे.
आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेनेचा वाढता प्रभाव हा पक्षाच्या संघटनात्मक बळाचा, नेतृत्वावरील विश्वासाचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा परिणाम मानला जातो. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संघटनात्मक मार्गदर्शनाखाली शिवसेना आगामी काळातही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपले स्थान अधिक बळकट करत जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, असा विश्वास शिवसैनिक आणि जनसामान्यांमध्ये दृढ होत आहे.


















